बेसहारांचा कृपया सहारा बना मित्रांनो

बेसहारांचा कृपया सहारा बना मित्रांनो.

काल संध्याकाळी 7 वाजता अक्षयभाऊंचा व्हाॅट्सअपवर मेसेज आला की सर कुठे आहात?
मी रिप्लाय दिला जुन्नरला आहे.
एक काम होत?
मी म्हटलो सांगा.
ते बोलले मी मुंबईला आलोय.
मी बोललो काम बोला.
त्यांनी पुन्हा लिहिले की एक 70 वर्षांची निराधार आजी घाटकोपर बसस्थानकात खुप दैनीय अवस्थेत पडून आहे. बस ड्रायव्हर स्वतः आणलेल्या जेवणातुन तिची उपजीविका करत आहे. तील घेऊन जुन्नरला यायचय परंतु माझ्याकडे गाडी भाडे देण्यासाठी पैसे नाहीत व जीप ड्रायव्हर 4000/- हजार भाडे मागतोय. मी लगेच रिप्लाय केला भाऊ काळजी करू नका पैसे जुन्नरला आल्यावर घेऊन जा. मानवता धर्म महत्वाचा आहे व तो जोपासला जायला हवा हिच शिकवण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण करताना दिली होती. आपण ती पाळलीच पाहिजे. व आपण तर शिवजन्मभुमीत जन्माला आलोय. या मातीचे ऋण पण आपणास फेडायलाच हव. तुम्ही बिनधास्त घरी या पैशाची चिंता करू नका.
घाटकोपर मध्ये माझा भाचा सुहास शिवाजी कोरडे राहत आहे त्यास हि खबर दिली.अक्षयभाऊ व सहकार्यांची त्याने जेवायची सर्व सोय केली होती परंतु अक्षयभाऊंना पोलीस स्टेशनची कारवाई करायची असल्याने हे नाकारले. मी अक्षयला विचारले किती वाजता तुम्ही जुन्नरला पोहचाल. तर त्यांनी 11:00 वाजेपर्यंत पोहचेल म्हणुन सांगितले.
मी अक्षयची वाट पाहू लागलो. एरवी पडत असलेल्या पावसाने जास्त जोर धरला होता. मला काळजी वाटत होती की एवढ्या पावसात हे येतील तर कसे? कारण मध्यंतरी माळशेज घाट चढून यायचे होते. अक्षयचा फोन लागत नव्हता. घड्याळात एक वाजले होते. माझी चिंता वाढू लागली होती. काही सुचत नव्हते. रात्र भयानक भासू लागली होती. काय झाले असावे? नको ते प्रश्न डोक्यात डोकावत होते. जीवाची घालमेल चालू झाली होती. दोनची वेळ झाली होती. फोनवर सारखीच काॅल करण्याची धडपड चालू होती. घरातील व्यक्तींना त्रास नको व त्यांना डिस्टर्ब नको म्हणून घराबाहेरच उभा होतो. असंख्य मच्छरांचे माझ्या शरीरात सुया खुपसून शरिरातील रक्त खेचून भुक भागविण्यासाठीचे प्रयत्न चालू होते. खरखर अंग नखांनी खाजवत फोन काॅल लावत होतो. 2:30 च्या दरम्यान फोन उचलला गेला हा सर असे अक्षयचे शब्द कानी पडले. आनंद द्विगुणित झाला. अरे कूठे आहात विचारले. फक्त म शब्द कानी पडला व फोन डेड झाला. पुन्हा काही सुचेनासे झाले.
आता खुपच मच्छरांनी मला गराडा घातला होता. मी घरात येऊन आंथरलेल्या सतरंजीवर विचार करत आडवा झालो. विचारांचे थैमान डोक्यात माजले होते. काहीच सुचत नव्हते. चार वाजले होते. रात्रभर डोळा लागला नव्हता. सर्व रात्र विचित्र विचारांच्या मंथनात गेली होती. सारखे लक्ष मोबाईल फोनकडे लागले होते. आत्ताच अक्षयचा फोन येईल मगच फोन येईल काही उमगत नव्हते. हाच विचार करत करत डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप मंदावत चालली होती. आत्ता तर अर्थवट डोळे मिटले होते. तेवढ्यात मोबाईलमधील जय जय रामकृष्ण हरी रिंगटोन वाजू लागली. नक्कीच अक्षयचा फोन असणार यात शंकाच नव्हती. फोन रिसिव्ह केला. पलीकडून येणारा आवाज अक्षयचा होता. सर दहा मिनिटांनी घरी पोहचतो बोलु लागला. डोळ्यावरील आलेली झापड क्षणात नाहीशी झाली. पत्नी स्वातीला उठवले. चहा ठेव सहा सात कप ठेव बोललो. मी बाहेर जाऊन उभा राहिलो. अक्षय गाडी घेऊन घरापुढे उभा राहीला. खुप समाधान वाटले. सगळ्या चिंता दुर झाल्या. गाडीत डोकावले तर आजी व आजुन दोघे निराधार गाडीत होते.
अक्षयला विचारले आजून दोघे कोठे मिळाले. तो बोलला कल्याण मार्गावर यातील आसामचा राहणार कचराकुंडीत सडलेले अन्न रात्री एकला खाताना दिसला व त्याला सोबत घेतले. तर दुसरा कल्यानजवळ दीड च्या दरम्यान पडत असलेल्या पावसात उघडाच तेथील डबकात बीड्या शोधत होता. त्याला प्रथम घरात जमा केलेली कपडे घालायला दिली. त्याला ती पण घालता येत नव्हती. हाताला मार लागल्याच्या जखमा दिसत होत्या. त्याला कपडे घालण्यास मदत केली. त्याला काहीच बोललेल समजत नव्हते. अंडरपॅण्ट सोडून अंगावर काहीच नव्हते. थंडीने खुप धडधड उडत होता. आजी गुजरातच्या मारवाडी समाजाच्या होत्या. काम धंद्यासाठी घाटकोपरला आल्या होत्या. परिस्थितीने त्यांना गुडघे टेकायला लावले होते. मुलगा असूनही तो त्यांच्याकडे पहात नव्हता. दोन्ही तळपाय सोलून निघले होते. त्यांना हलने सुद्धा असह्य होत होते. त्या सर्वांची समजूत घालावी हा अग्रह अक्षयने केला तेंव्हा मी बोलू लागलो होतो. तिघांपैकी कुणालाही मराठी भाषा समजत नव्हती. एकाकडेच आधारकार्ड होते व त्यावरून तो बिहारचा असल्याचे समजत होते.
पत्नीने बनवलेला चहा फक्त त्यातील एकजण प्याला. त्यांना आरामाची गरज भासत होती. अक्षयला पैसे व जवळपास दहा ड्रेस व आजीला एक साडी दिली. व यांची व्यवस्था करण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडु नकोस म्हणुन सांगितले. अक्षय त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला व सकाळी त्या दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन तेथील कार्यवाही करून पुण्यास निराधाराश्रमात नेऊन सोय करणार होता. अक्षयचा हेवा वाटला. कुणाचा कोण परंतु जीवन या निराधारांच्यासाठी या लहान वयातच बहाल केल्याचा गर्व झाला. शेवटी शिवबांचा शेवकच या निराधारांसाठी शिवजन्मभुमीत जन्माला आल्याचे समाधान वाटते.
धन्यवाद अक्षयभाऊ आपल्यामुळेच माझ्या हातून या तीन निराधारांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
आत्ताच अक्षयभाऊंचा फोन आला होता की सर मी यांना पुण्याला घेऊन निघालोय. काही समस्या आल्यावर फोन करा भाऊ म्हटले. नक्कीच सर म्हणून अक्षयने फोन कट केला. भाऊ आपल्या हातुन अश्याच निराधारांची सेवा घडत राहो व त्यांचा मसिहा म्हणुन समाजात एक शिवबांचा निस्वार्थ सेवक म्हणून नावलौकिक प्राप्त होवो हीच सदिच्छा. मित्रांनो या कार्यात सहभागी होऊन आपण अक्षयभाऊंच्या कार्यास हातभार लावाल ही विनंती.
(बेसहारांच्या हितासाठी ही पोस्ट शेर करून मानवतेच्या प्रचारास मदत करा जेणेकरून त्यांना सहारा मिळु शकेल )
श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370

 

 

 

1 thought on “बेसहारांचा कृपया सहारा बना मित्रांनो

  1. maza salam ahe tumchya karyala mi pn yeuka tumchyat fkt gor garibansathi jiv zurto maza pn tyana kuni vali nhi tr APN sgle help kru

Comments are closed.